मंत्र्यांचे बंगले-गाड्या लिलाव आंदोलनापूर्वी तुपकरांसह शेतकऱ्यांची धरपकड नियमित कर्जदारांना २ लाखांचे प्रोत्साहन अनुदान व वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या कक्षेत घेण्याची मागणी मुंबई : शेतकरी कर्जमाफीतील वंचित शेतकऱ्यांचा समावेश करावा, तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आज, २७ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, तुपकर यांच्यासह अक्षय पाटील व शेकडो शेतकऱ्यांना यलो गेट पोलीस ठाण्यात ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तुपकर यांनी सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर ठोस निर्णय न घेतल्यास मुंबईत मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि सरकारी वाहने प्रतीकात्मकरीत्या जप्त करून त्यांचा लिलाव करण्याचा इशारा दिला होता. या घोषणेनंतर पोलिस प्रशासनाने आंदोलन रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या. आंदोलनाची पूर्वतयारी सुरू असतानाच राज्याच्या विविध भागांतून मुंबईकडे निघालेल्या तुपकर समर्थक कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याचे वृत्त यापूर्वी समोर आले होते. त्यामुळे आंदोलनाच्या दिवशी मुंबईतील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या रविकांत तुपकर यांच्या आंदोलनामागे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देणे, कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या कक्षेत समावेश करणे, तसेच कर्जमाफी योजनेतील त्रुटी दूर करणे या मागण्या आहेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही शासनाने दिलासा द्यावा, अशी त्यांची भूमिका आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध भागांत बंदोबस्त वाढवला आहे. यलो गेट पोलीस ठाणे हे दक्षिण मुंबईतील महत्त्वाचे पोलीस ठाणे असून ते कर्नाक बंदर परिसरात आहे. तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांना नेमक्या कोणत्या कायदेशीर तरतुदींनुसार ताब्यात घेण्यात आले, तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे का, याबाबत अधिकृत पोलिसांकडून स्पष्ट माहिती मिळाल्यानंतर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा मुंबईतील राजकीय आणि प्रशासकीय