Now Playing
"आटपाडीचं प्रतीक शिल्प की नगरपंचायतीच्या निष्काळजीपणाचं शिल्प?"
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
"आटपाडीचं प्रतीक शिल्प की नगरपंचायतीच्या निष्काळजीपणाचं शिल्प?"
तीन राज्यांचे माजी राज्यपाल शिक्षण क्षेत्रातील प्रख्यात शिक्षण तज्ञ व ऋषी तुल्य डॉ डी वाय पाटील यांनी घेतला अखेरचा श्वास. मान्यव रांनी घेतले अखेरचे दर्शन.
आज माजी राज्यपाल व शिक्षण महर्षी डॉ डी.वाय पाटील यांनी वयाच्या 90 व्या वर्ष घेतला घेतला अखेरचा श्वास.
लातूर-बाभळगाव मध्ये शेतकरी आणि शिवसैनिक यांनी खरेदी केलेले पोटॅश खत हे बोगस असल्याचा आरोप करीत ठिय्या आंदोलन केले
देवर्जन येथील देव नादीत सरळीकरणामुळे जल साठ्यात वाढ,शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण
BHMS-CCMP नोंदणी प्रस्तावाविरोधात IMA चा २४ तास वैद्यकीय सेवा बंदचा सरकारला इशारा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारावा महिलांची आयुक्तांकडे मागणी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारावा महिलांची आयुक्तांकडे मागणी
वाढीव घरपट्टी आंदोलन कृती समिती यांचे वतीने भव्य धडक मोर्चा
मौजा रेडवा येथील गोवर्धन सावध यांच्या घरातून अज्ञात चोराने 36 हजार रुपयांची चोरी करून लंपास तालुका रिपोर्टर रामदत राठोड
आज बहुजन क्रांती दलित संघटनेच्या वतीने गर्भपात प्रकरणी जसा डॉक्टर व साथीदार एजंट यांच्या गुन्हा दाखल झाला तसा आईवडील यांचेवर ही गुन्हा नोंद करा .तीव्र आंदोलन इशारा.
Comments (1)
Ashok Pawar MD
25 Sep, 2025"आटपाडीचं प्रतीक शिल्प… जे शहराची शान, ओळख आणि अभिमान ठरलं होतं. डाळिंब आणि मेंढीचं हे शिल्प म्हणजे आटपाडीच्या संस्कृतीचं प्रतीक! पण नगरपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे आज तेच शिल्प दुर्लक्ष आणि अधःपतनाचं प्रतीक बनलं आहे…" --- "अण्णाभाऊ साठे चौकातील कोपऱ्यावर उभारलेलं ‘आपली आटपाडी’ शिल्प… या शिल्पाभोवती कारंजं, हिरवळ, रंगीबेरंगी लाइट्स अशी लाखो रुपयांची सजावट केली गेली होती. नागरिक येथे येऊन अभिमानाने फोटो काढतात, आटपाडीचं नाव जगभर पोहोचवत होते. पण आज? या ठिकाणी कारंज्यातलं पाणी अक्षरशः काळं झालं आहे… पाण्यात आळ्या उठलेल्या आहेत… आणि मच्छरांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे." --- "शहराच्या मध्यवर्ती चौकात, पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयाच्या शेजारी हा रोगट वातावरण तयार झालंय. नागरिक जेथे आनंदाने यायचे, फोटो काढायचे… तेच आता डेंग्यू-चिकनगुनियाचं संभाव्य केंद्र बनलंय." --- "नगरपंचायतीला वारंवार तक्रारी करूनही मुख्य अधिकारी कानावर घेत नाहीत. कालच जिल्हाधिकारी आटपाडीत होते. नागरिकांनी स्वतः कलेक्टरांपुढे नगरपंचायतीच्या निष्काळजीपणाचा पाढा वाचला. पण मुख्य अधिकारी एवढे बेफिकीर की… कलेक्टरांशी देखील भेट घेतली नाही! अधिकारी गायब झाले. आता प्रश्न असा… हे अधिकारी खरंच जनतेसाठी काम करतात की कोणाच्या तरी वरदहस्ताने?" --- Anchor "आटपाडीचं प्रतीक शिल्प हे शहराच्या ओळखीचं दार आहे… आणि त्याची अशी दुर्दशा करणाऱ्या नगरपंचायतीला नागरिकांचा संताप आता प्रचंड आहे. प्रशासनाने तात्काळ पावलं उचलली नाहीत… तर नागरिक रस्त्यावर उतरतील, हे निश्चित आहे!"