Now Playing
“दिघंची गावात भगरीच्या पिठाने घात – २० नागरिक विषबाधित!”
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
“दिघंची गावात भगरीच्या पिठाने घात – २० नागरिक विषबाधित!”
तीन राज्यांचे माजी राज्यपाल शिक्षण क्षेत्रातील प्रख्यात शिक्षण तज्ञ व ऋषी तुल्य डॉ डी वाय पाटील यांनी घेतला अखेरचा श्वास. मान्यव रांनी घेतले अखेरचे दर्शन.
आज माजी राज्यपाल व शिक्षण महर्षी डॉ डी.वाय पाटील यांनी वयाच्या 90 व्या वर्ष घेतला घेतला अखेरचा श्वास.
लातूर-बाभळगाव मध्ये शेतकरी आणि शिवसैनिक यांनी खरेदी केलेले पोटॅश खत हे बोगस असल्याचा आरोप करीत ठिय्या आंदोलन केले
देवर्जन येथील देव नादीत सरळीकरणामुळे जल साठ्यात वाढ,शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण
BHMS-CCMP नोंदणी प्रस्तावाविरोधात IMA चा २४ तास वैद्यकीय सेवा बंदचा सरकारला इशारा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारावा महिलांची आयुक्तांकडे मागणी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारावा महिलांची आयुक्तांकडे मागणी
वाढीव घरपट्टी आंदोलन कृती समिती यांचे वतीने भव्य धडक मोर्चा
मौजा रेडवा येथील गोवर्धन सावध यांच्या घरातून अज्ञात चोराने 36 हजार रुपयांची चोरी करून लंपास तालुका रिपोर्टर रामदत राठोड
आज बहुजन क्रांती दलित संघटनेच्या वतीने गर्भपात प्रकरणी जसा डॉक्टर व साथीदार एजंट यांच्या गुन्हा दाखल झाला तसा आईवडील यांचेवर ही गुन्हा नोंद करा .तीव्र आंदोलन इशारा.
Comments (1)
Ashok Pawar MD
25 Sep, 2025“आटपाडी तालुक्यातील दिघंची गावात सणासुदीतच नागरिकांना विषारी धक्का बसलाय! राजेवाडी चौकातील दत्तात्रय यादव यांच्या किराणा दुकानातून घेतलेल्या भगरीच्या पिठाच्या भाकऱ्या खाल्ल्यानंतर तब्बल १५ ते २० नागरिकांना विषबाधा झाली आहे. गावभर भीतीचं वातावरण पसरलं असून रुग्णांना तातडीने दवाखान्यात दाखल करून उपचार करण्यात आले आहेत. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, मात्र अजूनही काही नागरिकांना त्रास होत असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी आम्ही उपचार करणारे डॉक्टर्स तेव्हा त्यांनी असं सांगितलं, जेव्हा आम्ही त्रास झालेल्या पेशंट्स सोबत बोललो तेव्हा त्यांनी त्यांचा अनुभव असा सांगितला नागरिकांनी काय काळजी घ्यायचे ती नीट ऐका 1. विश्वासार्ह दुकानातून खरेदी करा – स्थानिकपणे ओळख असलेल्या, परवाना असलेल्या किरकोळ विक्रेत्यांकडूनच पीठ, मसाले किंवा फराळाचे पदार्थ घ्यावेत. 2. पॅकिंग तपासा – बंद पॅकेट घेत असाल तर उत्पादनाची तारीख, वापरण्याची मुदत (expiry), FSSAI नंबर नक्की पहा. 3. उघड्यावर विक्री होत असल्यास खबरदारी – ज्या पदार्थांवर माशा, धूळ बसली आहे ते खरेदी करू नयेत. 4. सुगंध व रंग तपासा – भगरीचे पीठ किंवा इतर धान्य-पिठे घेताना त्यात वास, ओलसरपणा किंवा बुरशीसारखी लक्षणे आहेत का ते तपासावे. 5. थोड्या प्रमाणात आधी वापरून पहा – नवी जागेवरून घेतलेला फराळाचा पदार्थ त्वरित जास्त प्रमाणात खाण्याऐवजी थोडे खाऊन शरीराची प्रतिक्रिया पाहावी. 6. तक्रार नोंदवा – जर अन्न पदार्थ निकृष्ट किंवा दूषित वाटले तर स्थानिक अन्न व औषध प्रशासन (FDA) कार्यालयात तक्रार करावी. --- दुकानदारांनी घ्यायची काळजी 1. साठवण स्वच्छ ठेवा – धान्य, पीठ, फराळाचे पदार्थ ओलसर जागी किंवा थेट जमिनीवर न ठेवता स्वच्छ व हवेशीर ठिकाणी साठवा. 2. तारीख संपलेला माल विकू नका – एक्सपायरी डेट संपलेले किंवा खराब झालेले पदार्थ लगेच वेगळे करून टाकावेत. 3. पारदर्शकता ठेवा – जर मोकळ्या स्वरूपात (bulk) माल विकत असाल तर ग्राहकाला तो कधी आणलेला आहे याची माहिती द्यावी. 4. स्वच्छता पाळा – दुकानात उंदीर, कीटक यांचा उपद्रव होऊ नये म्हणून नियमित फवारणी, स्वच्छता करणे आवश्यक आहे. 5. FSSAI परवाना असावा – किराणा दुकानाने अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचा (FSSAI) परवाना घ्यावा आणि नियमांचे पालन करावे. 6. कागदपत्रे उपलब्ध ठेवा – जर ग्राहकाने विचारले तर माल कुठून आणलेला आहे याचे बिल/पावती दाखवणे. या संपूर्ण घटनेला जबाबदार ठरवले जाणारे दुकानदार यांच्याशी आम्ही चर्चा केली तेव्हा ते काय म्हणतात ते आपण पाहूया याच दुकानातून अन्यही नागरिकांनी खाद्यपदार्थ खरेदी केलेले आहेत परंतु त्यांना त्रास झालेला नाही त्रास ठराविक लोकांना झालेला आहे या पाठीमागचं नक्की कारण काय आहे ते सखोल चौकशी केल्यानंतरच कळणार आहे यामध्ये दोष कोणाचा हे येणाऱ्या काळात कळेलच सणासुदीत असा प्रकार घडल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ग्राहक आणि दुकानदारांनी स्वच्छता, पॅकिंग आणि अन्नसुरक्षा याबाबत अधिक काळजी घेणं अत्यावश्यक ठरतंय.”