Now Playing
अल्पवयीन मुलीचे अपहरण होऊन 55 दिवस, न्यायालयाचा आदेश होऊनही पोलीस सुस्तच परिवाराकडून उपोषणाचा इशारा
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
अल्पवयीन मुलीचे अपहरण होऊन 55 दिवस, न्यायालयाचा आदेश होऊनही पोलीस सुस्तच परिवाराकडून उपोषणाचा इशारा
सध्याचे खासदार उघड आमच्या बरोबर आहेत पूर्वीचे खासदार तिकडून आम्हाला माहिती देत होते जयंतराव पाटील
जि .प . निवडी नंतर विश्वजीत कदम
जि प अध्यक्ष निवड झाल्या नंतर संगीता पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
देवस्थानाला बदनाम करण्यासाठी खोटे आरोप केले जातात देवस्थान समितीकडून खुलासा
बांधकाम कामगारांना मिळणारे सुरक्षा संच केंद्र जवळ निर्माण करावे अन्यथा आंदोलन अजित खंदारे
आटपाडी मध्ये भाजपकडून निषेध
हत्तीवरील मिरवणुकीनंतर प्रवीण कोळपे यांनी केल्या भावना व्यक्त
हत्तीवरच्या मिरवणुकीने... आयपीएस ची संख्या 100% वाढते गोपीचंद पडळकर
पडळकर यांच्या विरोधात विद्या मोठे यांचे कडून न्यायालयामध्ये याचिका दाखल
सरकारी विजेवर खासगी गाडी चार्ज? आटपाडी तहसील कार्यालयातील धक्कादायक प्रकार उघड!
Comments (1)
Ashok Pawar MD
01 Jun, 2025अल्पवयीन मुलीचे अपहरण होऊन 55 दिवस उलटले न्यायालयाचा आदेश होऊन ही पोलीस सुस्तच पीडित परिवाराचा उद्यापासून पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाचा इशारा आटपाडी येथून महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा अपहरण करण्यात आलं होतं सदर घटनेबाबत पीडित मुलीच्या परिवाराने सात एप्रिल 2025 रोजी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्हण्यातील मुख्य आरोपी अंकुश सिताराम आलदर राहणार कोळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर सध्या तो आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथेच वास्तव्यास असतो याचे नावही तक्रारीमध्ये नोंद आहे शिवाय त्याला बनपुरीतील राजकारणाशी संबंध असलेले संजय यमगर अनिल पुकळे हर्षद बंडगर सागर चौगुले अजय चौगुले हे सदर आरोपीला सहकार्य करत आहेत याबाबत ही पोलिसांना माहिती दिलेली आहे परंतु पोलिसांनी राजकीय दबावापोटी आज तागायत कसलीही हालचाल केलेली नाही पीडित मुलीचे कुटुंबीय यांनी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांची भेट घेऊन पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल तक्रार केली आहे शिवाय पोलीस या प्रकरणांमध्ये आरोपीला शोधत नाहीत म्हणून आटपाडी येथील फौजदारी न्यायालयामध्ये एडवोकेट विलास पाटील यांचे मार्फत दावा दाखल करण्यात आला होता सदर दाव्यामध्ये न्यायालयाने मुलीच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करत तात्काळ आरोपीला अटक करून न्यायालयापुढे हजर करण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु पोलिसांकडून कोणतीही हालचाल होत नाही म्हणून मुलीच्या कुटुंबीयांकडून सोमवार २ जून पासून आटपाडी पोलीस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. सदरची अपहरत मुलगी ही नेहमीप्रमाणे गाव खेड्यातून तिच्या उज्वल भविष्यासाठी शिकण्यासाठी येत होती सीईटीचे शिकवणी क्लास साठी आलेली होती तिची पार्थ ठेवून तिचं सहा एप्रिल 2025 रोजी आरोपी अंकुश आलदर व सहकाऱ्यांनी जबरदस्ती अपहरण केलं होतं शिकवणी क्लास साठी केलेली मुलगी संध्याकाळी उशिरापर्यंत परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध व चौकशी केल्यानंतर या घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर 7 एप्रिल रोजी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणांमध्ये सुरुवातीपासूनच पोलिसांकडून चालढकल व गुन्हा कमजोर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे पीडित कुटुंबाकडून तक्रार घेताना सुद्धा अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवून घेतलेला आहे शिवाय या घटनेमध्ये पीडित परिवाराने वारंवार पाठपुरावा करून सुद्धा पोलिसांकडून तपास होत नसल्याने पोलीस चौकशी अधिकारी राजीव केंद्रे यांच्याकडून तपास काढून पोलीस अधिकारी बायस यांच्याकडे दिलेला आहे परंतु अद्याप परिणाम शून्यच आहे या गंभीर घटनेबाबत आम्ही तालुक्यातील काही माध्यम प्रतिनिधींनी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधून गंभीरतेबाबत अवगत केलेलं आहे तरीसुद्धा अद्याप कोणताही परिणाम समोर आलेला दिसत नाही एका बाजूला महिलांच्या सन्मानासाठी अनेक प्रयत्न केले जात असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे मात्र या सरकारच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या गंभीर घटना होत आहेत परंतु सुरक्षा यंत्रणाच आरोपींना अभय देत आहेत त्यामुळे या सरकार वरील सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास कमी होत चाललेला आहे सदर घटनेमध्ये स्थानिक राजकारणी यांचा पोलिसांवरती मोठा दबाव असल्याने पोलीस मोठ्या दबावाखाली आहेत या घटनेमध्ये आरोपीचे मामा संजय यमगर याच राजकीय वजन आहे व याचा वापर करून तो सध्या आरोपीला मदत करत आहेत याबाबत पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सर्वकाही माहिती पुरवलेले असताना सुद्धा या आरोपींकडे साधी चौकशी सुद्धा पोलिसांनी केल्याचं निदर्शनास येत नाही जर राजकीय दबावापोटी अशा पद्धतीने गोरगरीब जनतेवरती अन्याय होत असेल न्यायालयातून आदेश होऊन सुद्धा पोलीस हालचाल करत नसतील तर मात्र लोकांमधून मोठा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही