Now Playing
जांभुळणी येथे वन विभागाच्या जमिनीवरती आग लागून 100 हेक्टर वनसंपदा जळून खाक अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा बद्दल नागरिकांमधू
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
जांभुळणी येथे वन विभागाच्या जमिनीवरती आग लागून 100 हेक्टर वनसंपदा जळून खाक अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा बद्दल नागरिकांमधू
सध्याचे खासदार उघड आमच्या बरोबर आहेत पूर्वीचे खासदार तिकडून आम्हाला माहिती देत होते जयंतराव पाटील
जि .प . निवडी नंतर विश्वजीत कदम
जि प अध्यक्ष निवड झाल्या नंतर संगीता पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
देवस्थानाला बदनाम करण्यासाठी खोटे आरोप केले जातात देवस्थान समितीकडून खुलासा
बांधकाम कामगारांना मिळणारे सुरक्षा संच केंद्र जवळ निर्माण करावे अन्यथा आंदोलन अजित खंदारे
आटपाडी मध्ये भाजपकडून निषेध
हत्तीवरील मिरवणुकीनंतर प्रवीण कोळपे यांनी केल्या भावना व्यक्त
हत्तीवरच्या मिरवणुकीने... आयपीएस ची संख्या 100% वाढते गोपीचंद पडळकर
पडळकर यांच्या विरोधात विद्या मोठे यांचे कडून न्यायालयामध्ये याचिका दाखल
सरकारी विजेवर खासगी गाडी चार्ज? आटपाडी तहसील कार्यालयातील धक्कादायक प्रकार उघड!
Comments (1)
Ashok Pawar MD
20 Apr, 2025जांभुळणी येथे वन विभागाच्या जमिनीवरती आग लागून 100 हेक्टर वनसंपदा जळून खाक अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाबद्दल नागरिकांमधून संताप आटपाडी तालुक्यातील जांभुळणी गावाच्या हद्दीत असलेल्या वन जमिनीवर शनिवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास आग लागून वन जमीन व खाजगी जमीन अशी जवळपास 100 हेक्टर जमिनीवरील वनसंपदा जळून खाक झाली आहे सदर जमिनीची देखभाल करणारी शासकीय यंत्रणा वेळेत पोहोचली नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे जांभुळणी गावाच्या पूर्वेस असलेल्या वन विभागाच्या जमिनीमध्ये शनिवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास आग लागली ची घटना निदर्शनास आल्यानंतर येथील स्थानिक नागरिकांनी वन विभागाला फोन करून माहिती देण्याचा प्रयत्न केला परंतु वन विभागाचे वनपाल वनक्षेत्रपाल यांचे फोन उचलले जात नव्हते तोपर्यंत स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु सदरची आग ही इतकी भयानक होती की या ठिकाणी लागलेली आग खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा पसरली रात्री उशिरापर्यंत आगीचे लोट पाहायला मिळत होते मात्र इतकी मोठी आपत्ती असताना सुद्धा वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी कोणीही इकडे फिरकले नाहीत असा स्थानिक नागरिकांनी आरोप केलेला आहे जेव्हा सुरुवातीला आग लागल्याचे निदर्शनास आलं तेव्हा नागरिकांनी आटपाडीचे वनक्षेत्रपाल यांना माहिती देण्यासाठी फोन केले परंतु फोन उचलला नाही शेवटी जिल्हा वनक्षेत्रपाल यांना माहिती दिली परंतु तेथूनही पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे आग मोठ्या प्रमाणामध्ये पसरली आणि यादीमध्ये हजारो वृक्ष जळून खाक झाले त्याचबरोबर या वन जमिनीमध्ये असलेले वन्यजीव जीवसृष्टी जळून खाक झाली आहे रात्री उशिरा वन विभागाचे कर्मचारी म्हणून दोन वनमजूर व रोजंदारीवरील दोन कर्मचारी चार जण घटनास्थळी पोचले पण आजीचं रुद्र रूप इतकं मोठं होतं की ही एवढी कुमक पुरेशी नव्हती त्यामुळे स्थानिक नागरिकांतून वन विभागाच्या या भोंगळ कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे वन रक्षणासाठी शासनाकडून भला मोठा पगार देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे मात्र वनांची सुरक्षा करण्यासाठी या लोकांकडून टाळाटाळ केली जाते तर यांना पगार का दिला जातो असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे सदर घटनेबाबत दोशी कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे