Now Playing
विवाहितेचा छळ; प्राथमिक शिक्षक भारत सूर्यवंशी सह अन्य चार जणांच्या विरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
विवाहितेचा छळ; प्राथमिक शिक्षक भारत सूर्यवंशी सह अन्य चार जणांच्या विरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
सध्याचे खासदार उघड आमच्या बरोबर आहेत पूर्वीचे खासदार तिकडून आम्हाला माहिती देत होते जयंतराव पाटील
जि .प . निवडी नंतर विश्वजीत कदम
जि प अध्यक्ष निवड झाल्या नंतर संगीता पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
देवस्थानाला बदनाम करण्यासाठी खोटे आरोप केले जातात देवस्थान समितीकडून खुलासा
बांधकाम कामगारांना मिळणारे सुरक्षा संच केंद्र जवळ निर्माण करावे अन्यथा आंदोलन अजित खंदारे
आटपाडी मध्ये भाजपकडून निषेध
हत्तीवरील मिरवणुकीनंतर प्रवीण कोळपे यांनी केल्या भावना व्यक्त
हत्तीवरच्या मिरवणुकीने... आयपीएस ची संख्या 100% वाढते गोपीचंद पडळकर
पडळकर यांच्या विरोधात विद्या मोठे यांचे कडून न्यायालयामध्ये याचिका दाखल
सरकारी विजेवर खासगी गाडी चार्ज? आटपाडी तहसील कार्यालयातील धक्कादायक प्रकार उघड!
Comments (1)
Ashok Pawar MD
10 Oct, 2024विवाहितेचा छळ; प्राथमिक शिक्षक भारत सूर्यवंशी सह अन्य चार जणांच्या विरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल अंजली आशिष शिंदे या विवाहितेने लग्नाच्या तिसऱ्या दिवसापासून पती आशिष बाळकृष्ण शिंदे सासरे बाळकृष्ण गंगाराम शिंदे सासु राधा बाळकृष्ण शिंदे सर्वजण राहणार घाटनांद्रे तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली सध्या राहणार नकोदर जिल्हा जलंदर पंजाब दीर विवेक बाळकृष्ण शिंदे सध्या राहणार कॅनडा व मावसदीर भारत दादासाहेब सूर्यवंशी राहणार करोली टी तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली या पाच जणांच्या विरोधात बेकायदेशीर पैशाची मागणी व छळ केल्याची तक्रार दिली आहे अंजली व आशिष यांचा विवाह 9 मार्च 2023 रोजी सांगली येथे झाला होता त्यानंतर तिसऱ्या दिवसापासून विवाहितेला प्राथमिक शिक्षक रांजणी तालुका कवठेमंकाळ येथे नियुक्त असलेल्या भारत सूर्यवंशी या शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सासरच्या मंडळींनी त्रास देणे सुरू केले दररोज विवाहितेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध कामे करायला लावणे जेवण अपूर्ण देणे मारहाण करणे शिवीगाळ करणे असा त्रास देण्यास सुरुवात केली लग्नाच्या वीस दिवसानंतर विवाहितेला नकोदर जिल्हा जलंदर पंजाब येथे नेऊन तेथेही तिला अशाच प्रकारचा त्रास देणे चालू ठेवले त्यानंतर तिचे नातेवाईक मामा व चुलते यांना बोलवून हुंडा स्वरूपामध्ये 32 लाख रुपयांची मागणी केली विवाहितेच्या घरची आर्थिक स्थिती ठीक नसल्याने नातेवाईकांनी पैसे देण्यास असमर्थता दाखवल्या नंतर 14 जुलै 2023 रोजी विवाहितेला अंगावरचे दागिने काढून घेऊन घरातून अंगावरील एका वस्त्रानिशी हाकलून दिले या सर्व घटनेचा मुख्य सूत्रधार प्राथमिक शिक्षक भारत सूर्यवंशी हा आहे भारत सूर्यवंशी हा विवाहितेच्या पतीचा मावस भाऊ आहे हा विवाहितेच्या सासरच्या मंडळींना विवाहितेला त्रास देण्याच्या बाबतीत मार्गदर्शन करायचा विवाहिता सांगलीत असताना प्रत्यक्ष विवाहितेच्या घरी जाऊन स्वतःच्या घरी बोलवून विवाहितेच्या सासरच्यांना सांगायचा व नकोदर पंजाब येथे गेल्यानंतर सुद्धा फोनवरून मार्गदर्शन करायचा तर विवाहितेचा दीर विवेक हा कॅनडा येथून त्याची आई म्हणजे विवाहितेची सासूला फोन करून विवाहितेला त्रास देण्यासाठी सांगायचा प्राथमिक शिक्षक भारत सूर्यवंशी याचा संपूर्ण लग्न ठरवण्यामध्ये पुढाकार होता व त्यानंतर शिंदे कुटुंब यांना मार्गदर्शन व सहकार्य करण्यामध्ये सक्रिय सहभाग आहे सर्वात प्रथम विवाह ठरवतेवेळी घाटनांद्रे येथे वडलारजीत प्रॉपर्टी करोली टी येथे खरेदी केलेली जमीन सांगली येथे खरेदी केलेली जमीन व त्या जमिनीवरती टोलेजंग बिल्डिंग पंजाब मध्ये असलेली सोन्या-चांदीची दुकाने व मोठं राहतं घर अशी मोठी प्रॉपर्टी असल्याची भुरळ विवाहितेच्या नातेवाईकांना घातली आणि विवाह नंतर लगेचच पैसे उकळण्याच्या उद्देशाने विवाहितेला त्रास देणे सुरू केले प्राथमिक शिक्षक भारत सूर्यवंशी याने अशा पद्धतीने यापूर्वीही या अन्य पद्धतीने आणखी कोणाला फसवले आहे का याची चौकशी होणे गरजेचे आहे विवाहितेचे सासरे बाळकृष्ण शिंदे यांचा सोने-चांदी गलाई व्यवसाय आहे बाळकृष्ण शिंदे हे घाटनांद्रे येथून 1988 साली फाटक्या वस्त्रानिशी घरातून बाहेर पडले होते व आज करोडो रुपयाची प्रॉपर्टी जमवलेली आहे गलाई व्यवसायामध्ये मजुरी ही खूप कमी मिळते त्या मजुरीमध्ये भट्टीतील कोळशाचा खर्च सुद्धा भागत नाही मात्र यांनी एवढी मोठी संपत्ती गोळा केली यामागे यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची फसवणूक तर करत नाहीत ना असा संशय सुद्धा येथे येण्यास हरकत वाटत नाही बाळकृष्ण शिंदे यांनी जमलेल्या संपत्तीची योग्य यंत्रणा मार्फत चौकशी होणे सुद्धा तितकंच आवश्यक आहे इथून पुढच्या काळामध्ये फोटोमध्ये दिसणारी ही मंडळी चांगलं घरंदाज स्थळ आहे म्हणून लग्न जमण्यास आली तर नागरिकांनी यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे या प्रकरणावरून स्वतः ठरवावे फसवणूक झाल्यानंतर पोलीस स्टेशनवर न्यायालयाचे खेटे मारण्यापेक्षा अशा भामटय़ा मंडळी पासून सावधानता बाळगावी.