Now Playing
सांगलीच्या मालू हायस्कूलमध्ये बोगस मतदानाची तक्रार तक्रारदाराला ताब्यात घेताना तणावाचे वातावरण
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
सांगलीच्या मालू हायस्कूलमध्ये बोगस मतदानाची तक्रार तक्रारदाराला ताब्यात घेताना तणावाचे वातावरण
नगराध्यक्ष मुख्याधिकारी यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर महेश कुमार पाटील यांचं तात्पुरतं आंदोलन स्थगित
रामनवमीपासून स्वच्छतेला सुरुवात करणार नगराध्यक्ष यु.टी . जाधव
वेळोवेळी केलेले अर्ज तात्काळ निकाली काढण्याचं आश्वासन मुख्याधिकारी वैभव हजारे
नक्षल्यांनी संविधानिक मार्ग स्विकारावा माजी मंत्री तथा अहेरीचे आमदार डॉ धर्मरावबाबा आत्राचे आव्हान
जंगलात भटकने सोडुन मुख्य प्रवाहात यावे आत्मसमर्पीत महीला नक्षलीचे आव्हान
महिला आयोगाचे अध्यक्ष यांच्या समाज माध्यमावर बातमीचा प्रभाव पडला असून राजीनाम्याची मागणी आता जिजाऊ ब्रिगेड करीत आहे.
निंबवडे येथे पतीकडून पत्नीची हत्या चारित्र्याच्या संशयातून
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तृतीय पंथीयांना सन्मानाने जगण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्व तोपरी सहाय्य करणार अशी ग्वाही दिली.
कोल्हापुरात गुढीपाडवा व मराठी नव वर्षाच्या स्वागता निमित्य करवीर गर्जना ढोल पथकाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार संजय बनसोडे यांनी घेतले उदागिर बाबा महाराज समाधीचे दर्शन
Comments (1)
Ashok Pawar MD
08 May, 2024सांगली लोकसभा मतदारसंघात सर्वत्र मतदान शांततेत होत असल्याचे चित्र दिसून येत असताना दुसरीकडे सांगलीच मात्र भयानक प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. सांगली शहरातील मालू हायस्कूल येथे असणाऱ्या मतदान केंद्रामध्ये अनेक महिला या मतदान करण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे मतदान अगोदरच झाल्याचे सांगण्यात आले. याबाबतची माहिती संबंधित महिलांनी राष्ट्रवादीचे युवा नेते विज्ञानदादा माने यांना दिल्यानंतर त्या ठिकाणी विज्ञानदादा माने यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता या ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करीत विज्ञानदादा माने यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचे महिलांनी सांगितले. त्या ठिकाणी बाहेरील अनेक मतदार मतदानाला आले नसताना त्यांच्या नावाने बोगस मतदान केल्याची तक्रार महिलांनी केल्यानंतर पोलिसांनी आपणाला अपशब्द वापरल्याची तक्रार संबंधित महिलांनी विज्ञानदादा माने यांच्याकडे केली. यावेळी त्यांच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाल्याने या ठिकाणी काही काळ गोंधळ निर्माण झाल्याचे वातावरण पाहावयास मिळाले. एकूणच जिल्ह्यात शांततेने चाललेल्या मतदानाला या प्रकाराने गालबोट लागले असून या ठिकाणी काही प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा आरोप मतदानासाठी आलेल्या महिला मतदारांनी केल्याचे बोलले जात होते.